Top News

चांदा गड च्या स्वतंत्र गोंडसाम्राजातील‌ अनेक राजे व महाराणीं पैकी एकाचही जिल्हाच्या ठीकानी स्मारक नाही ही लाजीरवानी गोष्ट.

 चांदा गड च्या स्वतंत्र गोंडसाम्राजातील‌ अनेक राजे व महाराणीं पैकी एकाचही जिल्हाच्या ठीकानी स्मारक नाही ही लाजीरवानीच गोष्ट.


गोंडसाम्राज्याचा स्वतंत्र इतीहासाचा विसर की व्दैश..?


आजी माझी आमदार, खासदार, पालकमंत्री यांना‌ का आढवल नाही गोंडसाम्राजाचा इतीहास.


ज्या मातीत निवडुण आले तेथील गोंडसाम्राज्याच्या स्वतंत्र इतीहासालाच विसरले..?



(विदर्भ माझा न्युज 24 - मुख्य संपादक),चांदा (चंद्रपुर):- 

चांदा ही गोंड साम्राज्याची तिसरी राजधानी आहे खांडक्या बल्लाळशाह राजे यांनी शिरपुर वरून राजधानी‌ हलवुन बल्लारशाह नामक शहराची स्थापना केली व कील्ला आणी महल‌ बांधले व राजधानी स्थापन केली, पुढे हिच राजधानी खांडक्या बल्लाळशाह राजे यांचा निधना नंतर बल्लारशाह वरून‌ राजे हीरशाह यांनी राजधानी हलवुन चांदा गडावर राजधानी स्थापन  केली,

चांदा(चंद्रपुर) वर इतीहासाचा ठसा आहे, जिल्हाला एतीहासीक वारसा प्राप्त झाला आहे, मात्र  चांदा(चंद्रपुर) जिल्हात आजवर जितके आजी‌ माझी लोक प्रतीनीधी झाले ह्या एकांना‌ही चांदा‌(चंद्रपुर) जिल्हाचा गोंड राजेंचा स्वतंत्र गोंडसाम्राज्याचा  इतीहासाचा विसर पडला की काय? 


चांदा‌(चंद्रपुर) जिल्हातील आज पर्यंतचे आजी माझी आमदार, खासदार, पालकमंत्रांना कधीच चांदा गोंडराजेंचा इतीहास आढवला नसेल का असा प्रशन पडतो आहे. 

राजकीय पक्ष देखील इतीहास जोपासण्या साढी हलचल करतांना कधीच आढळत नाहीत,


चांदा(चंद्रपुर) ही गोंडराजे खांडक्या बल्लाळशाह राजे यांनी नगरी स्थापन केली नगरी आहे त्यांच्या पच्छात त्यांचे पुत्र राजे हीरशाह हे गादीवर आले त्यांची ही चांदा गड राजधानीचे ठीकान गोंड राजेंचा स्वतंत्र इतीहास आहे मात्र भरपुर प्रमानात गोंड रजेंचा इतीहास पुसण्याच काम केल गेल व आता ही काही प्रमाणात सुरुच आहे,

गोंड राजेंच्याच राजधानी‌मध्ये राजेंच एकही स्मारक नाही ही जिल्हा साढी लाजिरवानीच गोष्ट आहे,


अगदी शासणाने कींवा प्रशासनाने स्मारक उभारल‌ नाही तर स्थानीक महानगर‌पालीकेला ही कधी खांडक्या बल्लाळशाहराजे आत्राम , हिरशाह राजे आत्राम ,भिमा लोकभा, बिरशाह राजे आत्राम,राज माता हीराई राणी यांच्या इतीहासाची कधीच जान झाली नाही का? 

ज्यांचा मातीत जन्मलो जांच्या राजधानी मध्ये आपन राहतोय ज्यांच्या मातीत निवडुण येतोय त्या राजेंचा कील्लयाची तर प्रशासनाच्या व आमदार,खासदार,पालकमंत्री यांच्या दुर्लक्षत्ते मुळे  दुराव्यस्था झालीच आहे,


मात्र कील्याची प्रवेश द्वारे सुरक्षीत आहे,  चांदा गड च्या स्वतंत्र इतीहासातील‌ राजे, महाराजें, महाराणींचा विसरच पडलेलाच दिसतोय. मात्र ही खरच आपल्या जिल्हा साढी लाजीरवानी‌ गोष्ट नाही का?

स्थानीक लोकप्रतीनीधींनी कधी इतीहास जपन्या साढी प्रयत्न का बर केले नाही? गोंडराजेंच्या इतीहासाचा द्वैश आहे का यांना?

येवढ्या मोढ्या साम्राज्यातील या आत्राम राज घराण्याच्या राज्यां पैकी एकाही राजेंच स्मारक उभारण्या साढी लोक प्रतीनीधी आणी प्रशासनाणे कधीच हालचाली केल्याच चित्र दिसत नाही, चांदा गड च्या आजी माझी पालकमंत्री,आमदार,खासदार‌ व प्रशासनाला  चांदा गड च्या स्वतंत्र इतीहासाचा व्दैश आहे का? 


की अस कोनत कारण आहे की एका ही आजी माझी पालकमंत्री,आमदार,खासदारांनी  व प्रशासनाने सुध्दा कधी आत्राम राज घराण्यातील एकाही राज्यांच अथवा राजमाता राणी हीराईच स्मारक उभारण्या साठी कधी खट पट केली नाही, कधी हलचल‌ केली नाही, अस का? 

लोकप्रतीधीधींना जनता निवेदण देऊन आंदोलन करून मागण्या करेल‌ तेव्हाच  लोकप्रतिनिधी काम करतील का? स्वताच्या शहराच जिल्हा च इतीहस जपन यांच स्वकर्तव्य नाही का?

इतर परीसरात स्थानीक इतीहास जोपासन्या साढी प्रशासन,आमदार, खासदार, पालकमंत्री सतर्क असतात सत्तत प्रयत्नशील‌ असतात मात्र चांदा (चंद्रपुर) जिल्हात गोंड साम्राज्याचा इतीहास जोपासण्याच काम नाही चांदा चे प्रशासन‌ करतांना दीसत आहे नाही आमदार, खासदार, पाकलकमंत्री  करतांना दीसत आहे..


राजमाता राणी हीराई आत्राम


चांदागड च्या गोंडशासकांचे राज्य चिन्ह


Previous Post Next Post