बल्हारशाह शहरात मुले चोरण्याच्या संशयावरून एका व्येक्तीला मार झोड.........
बल्हारशाह शहरात कुठलीही मुले चोरनारी टोळी सक्रीय नाही.......
अफवांनवर विश्वास ठेऊ नये.....बल्हारशाह पोलिसांना सुचना द्या. - विकास गायकवाड,सहाय्यक पोलिस निरीक्षक,बल्हारशाह
विदर्भ माझा न्युज 24 - बल्हारशाह
काही दिवसांन पासुन मुल चोलनारी टोळी सक्रीय असल्याचा मॅसेज सध्या सोशल मिडीयावर धुमाकुळ मचवत आहे, ज्याचा परीनाम मानसीग रोगी,साधु सन्यांसींना भोगावा लागत आहे,कोनीही व्यक्ती मुल चोरनारा आहे म्हणुन येखाद्या कडे इशारा करत असेल तर नागरीक जमा होऊन त्याला चोप देत आहेत, अशीच एक घटना काल बल्हारशाह शहरातील वस्ती विभागात घडली आहे.
काही लोकांनी एका व्यक्तीला मुल चोरनारा समजुन चांगलाच चोप दिला आहे.काल दुर्गा देवी विसर्जन असल्याने जागो जागी पोलिस कर्मचार्यांचा चोख बंदोबस्त होता, काही लोक एका व्यक्तीला मारत असल्याच पाहुन पोलिस घटना स्थळी पोहचली व सदर इसमास नागरीकांच्या तावडीतुन वाचवीले, दोन - तिन दिवसा अगोदर बामनी मध्ये सुद्धा असाच प्रकार घडला होता,
प्राप्त माहीती नुसार स्थानीक वैभव काॅंन्वेंट चा विद्यार्थी शाळा सुटल्यावर रस्ता ओलांडतांना आपल्या मित्राला आवाज देत होता, त्याच वेळी मागुन एका व्येक्तीने त्याच्या डोक्याला हात मारला मुलाने आपल्या वडीलांना आवाज मारली, तो पर्यंत मुल चोर असल्याची अफवा पसरली आणी परीसरातील नागरीकांनी त्या व्येक्तीला मुर चोरनारा समजुन मारने सुरु केले परीसरात पेट्रोलींगवर असलेल्या पोलिसांनी घटनास्थळी पोहचुन सदर 42 वर्षीय चैन्नई च्या त्या व्येक्तीला नागरीकांच्या तावडीतुन वाचवीले व पोलिस स्टेशनला चौकशी करीता घेऊन गेले, या बाबद डीबी इंचार्ज सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड यांनी माहीती दिली अस्ता सदर व्यक्ती हा मुल चोरनारा नसुन चैन्नई चा रसीवाशी आहे मानसीक त्रासाला कंटाळुण सदर व्यक्ती घर सोडुन निघुन आला असल्याची माहीती दीली असून चार-पाच दिवसा पासुन इकडे तिकडे फीरत होता.
दोन तिन दिवस पहीले बामनी मध्ये घडलेली घटना आणी काल वस्ती विभागात घडलेली घटना दरम्यान पोलिस वेळेवर पोहचली नस्ती तर नागरीकांनी चोप देन्यात व्येक्तीचा जिव जान्याची शक्यता नाकारता येत नाही,बल्हारशाह पोलिस दोन्ही घटना स्थळी वेळेवर दाखल झाल्याने णोठि अनर्थ टळला.
अफवांनवर विश्वास ठेऊ नये.....बल्हारशाह पोलिसांना सुचना द्या. - विकास गायकवाड
बल्हारशाह पोलिस स्टेशन चे डीबी इंचार्ज सहाय्याक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड यांनी माहीती दिली आहे की शहरात कूठलीच मुल चोरनारी टोळी फीरत नसुन अफवांन वर विश्वास ठेवू नये, संशया वरून कोनीही कुणाला मारू नये, त्याला पोलिसांच्या स्वाधीन करा पुलिस पुर्ण जांच करून कार्यवाही करणार त्या प्रमाने कायदा हातात घेणे योग्य नाही. या मुळे निष्पाप लोकांना मारहाण केली जाते. असे कृत्त कोनिही करू नये. असे सहाय्यक पोलिस निरीक्षक विकास गायकवाड यांनी म्हटले आहे.
