कळमना येथे क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण.
राजुरा (मनोज श्रीहरी गोरे | उपजिल्हा प्रतिनिधी ) :-- राजुरा तालुक्यातील मौजा कळमना हे महापुरुषांच्या विचारांना आत्मसात करून वाटचाल करणारे गाव असून येथे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातात. त्यातील एक भाग म्हणून क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या दोन्ही महामानवांनी ज्या काळात शिक्षणाची सोय नव्हती. त्या काळात फार परिश्रमातून चळवळ उभी केली त्यामुळेच खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकर यांचे विचार अमलात आणता आले. आणि त्याचा खरा उपयोग आजची पिढी घेत आहे. म्हणूनच क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजामध्ये रुजवणे व ते तेवढा फार मोठी काळाची गरज आहे कळमना गावामध्ये या फुले दांपत्यांचा पुतळा उभा राहिला.
या प्रसंगी विचारपिठावर कार्यक्रमा च्या उद्घाटिका डॉ. सौ. अभिलाषा गावतुरे, कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर वाढई, स्मार्ट सरपंच कळमना तथा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना चंद्रपूर तथा प्रदेश सचिव काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग महाराष्ट्र तथा प्रदेश सचिव राजीव गांधी पंचायती राज संघटन महाराष्ट्र हे होते. प्रमुख अतिथी बळीराज निकोडे मुख्य वक्ता चंद्रपूर, विशेष अतिथी नानाजी आदे मानोली रा को जी अध्यक्ष मंडळ , रवि शेंडे उपाध्यक्ष रा को जी मंडळ गडचादुर , नंदकुमार पाटील मोहुर्ले सचिव रा को जी मंडळ राजुरा, विक्रम नागोसे सहसचिव रा को जी मंडळ भुरकुडा, मंगेश गुरुनुले कोषाध्यक्ष रा को जी मंडळ सोनुरली, ज्योती ताई शेंडे सदस्य रा को जी मंडळ राजुरा, सुलोचना गुरुनुले सदस्य रा को जी मंडळ गडचादुर, शंकर निकुरे सदस्य रा को जी मंडळ शेडवाही, भाऊजी भेडाळे सदस्य रा को जी मंडळ नांदा, रविंद्र भोदेकर सदस्य रा को जी मंडळ शरद खु, संतोष महाडोळे सदस्य रा को जी मंडळ गडचादुर, विठ्ठल शेंडे सदस्य रा को जी मंडळ राजुरा प्रमुख पाहुणे बाळकृष्ण पिंगे आदर्श पोलीस पाटील कळमना, निलेश वाढ ई तंटामुक्त अध्यक्ष कळमना, कौशल्या कावळे उपसरपंच कळमना, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ पिंपळसेंडे,दिपक झाडे,रंजना दिवाकर पिंगे, सुनीता उमाटे, प्रियंका मनोज गेडाम, सिताराम जी मरापे ग्रामविकास अधिकारी कळमना महादेव ताजने माजी उपसरपंच,नुतन आत्राम माजी सरपंच,दुधे मैडम मुख्याध्यापक कळमना, दिलीप निमकर सर,शालीक पेदोर सर, इंदुबाई निकोडे, मंडळाचे अध्यक्ष प्रवीण भेडाळे, अमीत कावळे उपाध्यक्ष, श्रीकांत कुकुडे सचीव, शंकर फिसके कोषाध्यक्ष मंचावर उपस्थित होते.
या प्रसंगी सौ अभिलाषा ताई गावतुरे यांनी आदर्श सरपंच नंदकिशोर दादा वाढ ई यांनी निर्माण केलेल्या कळमना या आदर्श स्वच्छ, सुंदर, निर्मळ गावांमध्ये क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्ण कृती पुतळा उभारण्यात आला ही अभिमानास्पद गोष्ट आहे कळमना या गावाला निश्चितपणे या फुले दाम्पत्यांचे विचार नेहमीच प्रेरणादायी राहील मला खरोखरच आनंद झाला की ज्या गावचे सरपंच व समस्त गावकरी या फुले शाहू आंबेडकरी विचारांचे आहे त्या गावात क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुर्ण कृती पुतळा उभारण्यात आला या गावाला पुतळा अनावरण प्रसंगी मला उपस्थित राहता आले इतक सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्या प्रगत व विकसित गाव मला बघायला मिळाले निश्चितपणे या गावापासून प्रेरणा घेऊन या जिल्ह्यातील च नव्हे तर महाराष्ट्रातील जनता हे गाव आदर्श गाव म्हणून नावारुपाला य ईल अशी भावना व्यक्त केली कार्यक्रमाचे अध्यक्ष नंदकिशोर वाढई स्मार्ट सरपंच कळमना तथा जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र सरपंच संघटना चंद्रपूर यांनी सांगितले की ज्या गावांमध्ये सरपंच म्हणून मी काम करतो आहोत त्या गावांमध्ये महात्मा ज्योतिबा फुले समाज सुधारक मंडळ व समस्त ग्राम वासी यांच्या पुढाकाराने क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुर्ण कृती पुतळा उभारण्यात आला आहे त्याचा मला अभिमान वाटतो आहे जी जागा निकामी होती त्या जागेवर मी जैषठ नागरिकांना पार्क बांधले त्या जागेवर फुले दाम्पत्याचा पुतळा मला उभारता आला एवढं भाग्य मला लाभले हि फार आनंददायी बाब आहे संत तुकाराम महाराज यांनी सांगितल्या प्रमाणे अवघाचि संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोकी घेऊन जा घे माहे पंढरपुरा या अभंगा प्रमाणे मी माझ्या कळमना गावातील मायबाप जनतेला पांडुरंग विठ्ठल मानुन जनतेची सेवा करीत राहील व क्रांतीसुर्य ज्योतीबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा निश्चितच या गावामधुन पुढे चालवला जाईल अशी ग्वाही दिली कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बळीराज निकोडे चंद्रपूर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की महीला आणि युवकांमध्ये फुले शाहू आंबेडकरी विचारधारेची गरज आहे आणि कळमना येथील आदर्श सरपंच नंदकिशोर दादा वाढ ई यांच्या नेतृत्वाखाली गावातील जनतेनी बहुजन वादी विचार अंगीकारले आहे हे कळमना हे आदर्श गाव पाहुन मला मनापासून वाटते आहे असे विचार व्यक्त केले राजुरा कोरपना जिवती ज्योतीबा फुले समाज सुधारक मंडळ यांच्या कडून कळमना येथील आदर्श सरपंच नंदकिशोर वाढई यांचा सत्कार करण्यात आला कळमना हे गाव स्वच्छ सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक केलया बद्दल सत्कार करण्यात आला कळमना हे गाव निश्चित पणे चंद्रपूर जिल्हा मध्ये नव्हे तर महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवेल एवढे आदर्श गाव पाहुन हे मंडळ भाराऊन गेले आणि त्यांनी या कार्यक्रमात कुठल्याही सदस्यांनी भाषण न देता चंद्रपूर जिल्हा मध्ये नव्हे तर महाराष्ट्रात असे बहुजन विचारांचे आदर्श सरपंच निर्माण झाले पाहिजे तरच शहरं नव्हे तर कळमना गावासारखे असंख्य गावे आदर्श बनविली जातील म्हणून कळमना एवढ सुंदर निर्मळ आणि पर्यावरण पूरक केले निश्चितपणे हे महाराष्ट्रात आदर्श ठरेल म्हणून या बद्दल आदर्श सरपंच म्हणून त्यांचा सत्कार केला याप्रसंगी भाऊराव कावळे, सुरेश कावळे, अशोक कावडे मनोर कावडे अमोल कावडे गणपत वाढ ई,बापूजी वाढ ई आशिष कावडे मंगेश कावडे शंकर वाढ ई मारुती वाढ ई प्रवीण वाढ ई प्रभाकर वाढ ई मधुकर वाढ ई सुधाकर वाढ ई दिवाकर वाढ ई,मारुती वाढ ई,मारुती बालाजी वाढ ई गणपत कुकुडे ,रामचंद्र कुकुडे, सत्यपाल गुरनुले, विशाल गुरुनुले रामप्रसाद पवार ,वासुदेव वाढ ई कार्यकारी मंडळ मारुती भेंडाळे ,सुरज कुकुडे तन्मय कुकुडे शुभम वाढई आकाश वाढई ,भाविक वाढ ई रितीक कावडे मारुती वाढई,विशाल नागोसे ,अमित वसाके सहकारी मंडळ जय हनुमान मंदिर देवस्थान कमिटी कळमना, जय हनुमान क्रीडा मंडळ कळमना, न्यू पदावली भजन मंडळ कळमना, अखिल भारतीय गुरुदेव सेवा भजन मंडळ कळमना, गुरुदेव सेवा भजन मंडळ कळमना व समस्त गावकरी उपस्थित होते.
