पवन कल्याण आणि चंद्राबाबूंच्या भेटीने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.....
विदर्भ माझा न्युज 24 - हैदराबाद
आंध्र प्रदेशच्या राजकारणात, जनसेना प्रमुख पवन कल्याण यांनी टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी भेट दिल्याने चर्चेला उधान आले आहे. दोन्ही नेत्यांनी अलीकडच्या काळात तिसर्या बैठकीत राज्यातील परिस्थिती, सार्वजनिक समस्या आणि ताज्या राजकीय घडामोडींवर चर्चा केली. संभाव्य राजकीय आघाडीशिवाय वायएसआरसीपी सरकारच्या अपयशांविरुद्ध एकत्र लढण्याच्या शक्यतेवर महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे कळते.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नुकतीच दिल्लीत पवन कल्याण यांची भेट घेतल्यानंतर जनसेना प्रमुख आणि चंद्राबाबू नायडू यांच्यातील भेटीकडे राजकीय लक्ष लागले आहे. टीडीपी, भाजप आणि जनसेनेला सत्ताधारी वायएसआरसीपी विरुद्ध एकत्र येऊन लढण्यास वाव आहे का? असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र, या विषयावर भाष्य करणे घाईचे आहे.
आता पवनची चंद्राबाबूंसोबतची भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनली असून, आगामी निवडणुकीत टीडीपी आणि जनसेना यांच्यात युती होण्याच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

