विदर्भ माझा न्युज 24 - राजुरा
ओबीसीच्या विविध मागण्या राज्य व केंद्र शासनाकडे प्रलंबित असुन याचा पाठपुरावा करणे बाबतीतील काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना भेटून निवेदन देण्यात आले. यात जुनी पेन्शन योजना महाराष्ट्र राज्यामध्ये लागू करण्यात यावी, बिहार राज्याप्रमाणो ओबीसीची जातनिहाय जनगणना महाराष्ट्रात करण्यात यावी, ओबीसी मागास वर्गीय तसेच अल्पसंख्याक समाजाशी सलग्न विविध महामंडळाचे कर्ज माफ करून शासन दरबारी आणि कोर्टात असलेल्या केसेस त्वरीत मागे घ्याव्या, महात्मा फुले, सावित्राबाई फुले आणि अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार जाहिर करावा, निवडणुकामध्ये इव्हिएम चा वापर बंद करण्यात यावा, जिल्हयाच्या ठिकाणी ओबीसी विदर्यायांना शासकीय वस्तीगृह सुविधा करण्याच्या निर्णयाची त्वरीत अमलबजावणी करण्यात यावी.
वरील मागण्यांबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडे पाठपुरावा करून उचित कार्यवाही व्हावी हि विनंती करण्यात आली. मागण्या पुर्ण न झाल्यास महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमेटी ओबिसी विभागामार्फत दि. १५ मे २०२३ पासुन संपूर्ण महाराष्ट्र तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भानुदाजी माळी यांच्या सूचनेनुसार ओ.बी.सी.च्या विविध मागण्या संदर्भात मा. जिल्हाधिकारी ,चंद्रपूर यांना निवेदन देताना चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटी चे जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे, प्रदेश उपाध्यक्ष उमाकांत धांडे, प्रदेश सचिव नंदकिशोर वाढई, प्रदेश सरचिटणीस प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रदेश सचिव गुरुदास चौधरी, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दिवाकर निकुरे, राहुल चौधरी, राहुल ताजने, अजिंक्य मारकवार, विवेक खुटेमाटे, आशिष वाढरे, राजु पिपळशेंडे यांचे सह काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

