मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे फेसबुक लाईव्ह मधले महत्वाचे मुद्दे......
विदर्भ माझा न्युज 24 - मुंबई
💥 हिंदुत्व हा आमचा श्वास आहे, हा बाळासाहेबांनी दिलेला कानमंत्र आहे !
💥 मी वेळ देऊ शकत नव्हतो हे बरोबर.. कारण माझी शस्त्रक्रिया झाली होती !
💥 शिवसेना आणि हिंदुत्व वेगळं होऊ शकत नाही !
💥 शिवसेना कोणाची? अशी चर्चा कशाला ?
2014 ला शिवसेनेने प्रतिकूल परिस्थितीमध्ये 63 आमदार स्वबळावर निवडून आले ! बाळासाहेबांनंतरच्या शिवसेनेनेच हे सगळे दिले !
💥 विधान परिषदेच्या निवडणूकीपूर्वी मी सगळ्या आमदारांना भेटलो.लघुशंकेला गेलो तरी शंका. ही कसली लोकशाही? ..सध्याचं राजकारण म्हणजे 'रडकुंडीचा घाट' !
💥 शरद पवारांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारलं.पवारसाहेब, सोनियाजींनी विश्वास ठेवला !
💥 माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पदावर नको असेल तर मी का राहू? माझ्याशी थेट का बोलत नाही? सुरतला जाण्याची काय गरज ?
💥 मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनाचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद; फक्त मला हे समोरून येऊन सांगा !
💥 विरोधकांशी नव्हे तर जनतेशी आणि शिवसैनिकांशी बांधिल !
💥 आज मी मुक्काम वर्षावरून मातोश्रीवर हलवत आहे..राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतोय, मुंबईत यावं आणि राजभवनावर घेऊन जावं !