Top News

Without the permission of the village, no official will be allowed to set foot in the village....One-sided resolution of Kavtha and Chimta residents.

गावाच्या परवानगी शिवाय कोणत्याही अधिकाऱ्याला गावात पायच ठेऊ देणार नाही....कवठा व चिमटा वासियांचा एकमुखी ठराव।


 विदर्भ माझा न्युज 24 - आर्णी 



आर्णी तालुक्यातील कवठा ( बु. ) व चिमटा या ग्रामपंचायतीची आज दुपारी ग्रामसभा पार पडली यामध्ये कवठा व चिमटा वासियांनी आमच्या गावाच्या परवानगी शिवाय पाटबंधारे विभाग,महसूल विभाग व पुनर्वसन विभाग या विभागाच्या कोणत्याही अधिकाऱ्याने गावात प्रवेशच करू नये असा एकमुखी ठराव घेतला आणि ग्रामसभेमध्ये शेतीची व गावाची मोजणी व इतर निम्न पैनगंगा प्रकल्पाशी संबंधित कसलेही काम करू न देण्याचा संपूर्ण गाव वासियांनी एक मतांनी ठराव पारित केला.

 सरपंच भाग्यश्री अरविंद शिडाम,सुरज शिरपुरे , स्वप्निल ठाकरे, तुकारामजी गावंडे,अमित ठाकरे, ज्ञानेश्वर जुनगरे ,आकाश गावंडे, श्रावण पुस्नाके,संदीप आत्राम, दिलीप नकाते, पांडुरंग शिडाम, विलासराव जुनघरे,रघुनाथ ठाकरे,रघुनाथ भोयर,रामकृष्ण किनाके व इतर अन्य मान्यवर व महिला मंडळींनी ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

 आजच्या या ग्रामसभेमध्ये गावातील धरणविरोधी संघर्ष समितीची स्थापना सुद्धा करण्यात आली. कवठा व चिमटा येथील गावकऱ्यांनी जो एकमुखी निर्णय घेतला त्या निर्णयाचे स्वागत धरण विरोधी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांचे अभिनंदन केले व आभार मानले. बुडीत क्षेत्रातील सर्व गावांनी कवठा व चिमटा गावाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून अशाच प्रकारचे ठराव आपापल्या ग्रामसभेत पारित करावे आणि निम्न पैनगंगा प्रकल्पाला एकमुखी विरोध करावा असं जाहीर आव्हान धरण विरोधी संघर्ष समितीने केले आहे.

Previous Post Next Post