Top News

Public communication walk will be historic: District President MLA Subhash Dhote Resolution of the District Congress Committee to create public awareness against the injustice of the Central and State Governments.

जनसंवाद पदयात्रा ठरणार ऐतिहासिक : जिल्हाध्यक्ष आ. सुभाष धोटे


केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा जिल्हा काँग्रेस कमिटीचा संकल्प.



विदर्भ माझा न्युज 24 - चांदागड (चंद्रपूर)



दिनांक : २६ ऑगस्ट २०२३, चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते जननायक राहुल गांधी यांच्या भारत जोडो पदयात्रेच्या धर्तीवर दि. 3 ते 12 सप्टेंबर 2023 दरम्यान 'जनसंवाद पदयात्रा' चे आयोजन करण्यात येते आहे. ही जनसंवाद पदयात्रा ऐतिहासिक ठरणार असून पदयात्रेच्या माध्यमातून चंद्रपूर जिल्हयातील जनतेमध्ये केंद्र व राज्य सरकारच्या अन्यायाविरुद्ध जनजागृती करण्याचा काँग्रेसचा संकल्प असून राष्ट्रीय, राज्य पातळी ते स्थानिक पातळीवरील जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, शासन पुरस्कृत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, अन्याय, अत्याचार व अन्य समस्यांवर जनतेशी संवाद साधून जनभावना जाणून घेणे या पदयात्रेचा उद्देश आहे अशी माहिती चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सुभाष धोटे यांनी दिली. 



ते पुढे म्हणाले की, ही यात्रा भारत जोडो यात्रेच्या धर्तीवर दररोज किमान 25 किलोमीटरची असेल, या यात्रेचे नियोजन खालील प्रमाणे असेल. पदयात्रेची सुरुवात सकाळी 6 वा. प्रार्थना होईल. सकाळी 6.30 ते 9.30 वा. पदयात्रेचा पहिला टप्पा सुरु होईल. सकाळी 9.30 ते 12 वा. भोजन व विश्रांती असेल, दुपारी 12 ते 2 वा. जाहिर सभा, दुपारी 2 ते 3 वा. विश्रांती, दुपारी 3 ते 4 वा. भेटीगाठी, सायं. 4 ते 7 वा. पदयात्रेचा दुसरा टप्पा पार पडेल, सायं. 7.30 ते 9.30 वा. जाहिर सभा, रात्री. 1.30 ते 10.30 वा. भोजन व रात्री मुक्काम असे एकूण नियोजन असेल. या पदयात्रेत विभागीय पदयात्री, जिल्हा पदयात्री, विधानसभा पदयात्री अशा तीन टप्प्यांत पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सहभागी व्हायचे आहे. 

जनसंवाद पदयात्रा राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात दि. 3 सप्टेंबर 2013 रोजी सुरु करण्यात येणार आहे. यात्रेची सुरुवात जिल्ह्यातील ऐतिहासीक स्थळापासून होईल. यात्रेत जिल्ह्यातील मान्यवर नेते, आजी माजी खासदार / आमदार, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, आघाडी संघटना, सेल व विभाग संघटनांचे पदाधिकारी यांचा समावेश असेल. ही यात्रा लोकभावना जाणून घेण्यासाठी असल्याने यात्रेत महागाई, बेरोजगारी, महिलांवरील अत्याचार, शेतकरी मुद्दे व स्थानिक पातळीवरील जनसामान्यांचे प्रश्न, मुद्यांबाबत लोकांसोबत संवाद साधण्यात येईल.

या वेळी जिल्ह्यातील काँग्रेसचे माजी आमदार अविनाश वारजुरकर, माजी आमदार देवराव भांडेकर, माजी जि.परिषद अध्यक्ष सतीश वारजुरकर, महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष नम्रता ठेमस्कर, माजी महापौर संगीता अमृतकर, माजी नगराध्यक्ष अरुण धोटे, माजी जिल्हाध्यक्ष विनायक बांगडे,सेवादल काँग्रेस जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खनके, चंद्रपूर काँग्रेसचे जिल्हा शहराध्यक्ष रामु तिवारी, ओबीसी जिल्हाध्यक्ष प्रशांत दानव, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष सोहेल शेख, इंटक जिल्हाध्यक्ष प्रशांत भारती, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष मुन्ना तावाडे,युवक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश अडूर,प्रविण पडवेकर, नरेन्द्र बोबडे, कुणाल रामटेके, चंद्रपूर तालुकाध्यक्ष शामकांत थेरे,अनुसूचीत जाती महिला जिल्हाध्यक्ष निशा धोंगडे एन.एस.यु.आय जिल्हाध्यक्ष शफक शेख, सिंदेवाहीचे तालुकाध्यक्ष रमाकांत लोढे, ब्रम्हपुरीचे तालुकाध्यक्ष खेमराज तिडके, सावली जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख व सोशल मीडिया अध्यक्ष कमलेश गेडाम यासह चंद्रपूर जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी , जिल्ह्यातील विविध तालुक्याचे प्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post