सावळीच्या माणसांनी दिलेली प्रेमाची शिदोरी कधीच न संपणारी - ठाणेदार संदीप बारींगे
सावळी सदोबा - पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळी सदोबा पोलीस दूरक्षेत्रात आपल्या कार्यकाळात लोकाभिमुखतेचा नवा आदर्श निर्माण करणारे सन्माननीय ठाणेदार संदीप बारींगे यांची नुकतीच प्रशासकीय बदली झाली. त्यांच्या बदलीमुळे संपूर्ण परिसरात एक भावनिक वातावरण निर्माण झाले असून, सामान्य नागरिकांपासून ते पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यांपर्यंत प्रत्येकाच्या मनात हळवं गारूड निर्माण झालं आहे. येणाऱ्या प्रत्येकाला सन्मान देत,प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणं, नागरिकांच्या समस्या तात्काळ आणि संवेदनशीलतेने सोडवणं,गुन्हेगारीवर कठोर कारवाई आणि तरुणांमध्ये विश्वास निर्माण करणं या सगळ्या गोष्टींमुळे ठाणेदारबारींगेअल्पावधीतच सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवत होते.आज सावळी सदोबा प्रेस क्लब संघटनेच्या वतीने ठाणेदार बारिंगे यांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी बोलताना, ठाणेदार संदीप बारंगे भावुक होऊन म्हणाले,"सावळी परिसरातील नागरिकांनी जी माणुसकीची भावना आणि प्रेमाची शिदोरी दिली, ती कधीच विसरणार नाही. ही शिदोरीच मला पुढील वाटचालीत बळ देईल.
आपण जरी प्रशासनाच्या निर्णयामुळे इथून जात असलो, तरी या भागातील माणसं माझ्या मनात कायमची घर करून राहतील.या कार्यक्रमाला पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, तरुण नेते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे शब्दही त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमाचे आणि आदराचे प्रतीक होते. प्रेस क्लब संघटनेचेच्या अनेक सहकाऱ्यांनी आपल्या भाषणात सांगितले ठाणेदार बारींगे साहेबांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करताना देखील कधीही माणुसकीचा विसर पडू दिला नाही.
त्यामुळेच आज त्यांना निरोप देताना संपूर्ण संघटनेचे सर्व सहकारी भावूक झालं आहे.यावेळी अनेक मान्यवर आणि स्थानिक पत्रकार उपस्थित होते,अरविंद चव्हाण,जे.बी. पठाण,श्रीकांत देशमुख,सुरेश पवार, दुर्गेश कर्नेवार,सुरेश राठोड,मोहम्मद सर्वे,रमेश राठोड,आकाश राठोड, हिरासिंग राठोड,धनराज पवार,राहुल राऊत,असिफ सुमार,राजेश नागोसे,अजय मारबते,हरीश खरात,विनायक कोट्टावार,परोषत्तम नेवारे यांचा समावेश होता.सर्वांनी बारंगे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांचे कार्य कौतुकाने स्मरण केले.संदीप बारींगे यांनी फक्त पोलीस खात्याचे प्रतिनिधी म्हणून नव्हे, तर एका संवेदनशील प्रशासकीय अधिकाऱ्याच्या भूमिकेतून सामाजिक समज, न्यायनिष्ठा आणि तळमळीने काम केले.
त्यामुळेच आज त्यांचा निरोप हा एक औपचारिक कार्यक्रम न राहता, एका कुटुंबाचा सदस्य निरोप घेतोय, अशी भावना उपस्थितांच्या मनात निर्माण झाली होती.पदं जातात, बदल होत राहतात पण माणसं आणि त्यांचं मनातलं स्थान कायमचं असतं"हीच भावना संपूर्ण सावळी सदोबा परिसरातील नागरिकांना आज पाहायला मिळत होते.