शेतकऱ्यांना दिलासा ! शेतीची कामे करता येणार, राज्यात 6 जून पर्यंत पाऊस नाही - पंजाब डख
नागपूर : राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी दिलासा दायक बातमी 31 मे पासून ते 6 जून पर्यंत जोराने वारं सुटणार आहे. पाऊस काही येणार नाही. शेतकऱ्यांनी 6 जून पर्यंत पेरणीसाठी नीट करून ठेवावे. राज्यात 7, 8, 9 आणि 10 तारखेला भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे. मात्र, राज्यात 6 जून पर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. आजपासून जोराने वारं सुटणार आहे. त्यामुळे राज्यात चांगलं सूर्यदर्शन राहील. राज्यात 7, 8 जूनला पूर्व विदर्भ, पश्चिमी विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खान्देश, मराठवाडा या सगळ्या विभागामध्ये पाऊस पडणार आहे. 7 जून ते 10 जून च्या दरम्यान असलेला पाऊस दररोज भाग बदलत पडणार असल्याची माहिती प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी दिली आहे.